आठ दिवसांवर लग्‍न आलेल्या तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न 8 दिवसांवर आलेले, घरात लगीनघाई सुरू… अन् नवरदेव असलेल्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना 25 मार्चला सायंकाळी उकळगाव मनार्डी (ता. संग्रामपूर) येथे घडली. प्रशांत तेजराव दामोदर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे लग्न 2 एप्रिलला होणार होते. सायंकाळी त्याची आई शेतातून घरी …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍न 8 दिवसांवर आलेले, घरात लगीनघाई सुरू… अन्‌ नवरदेव असलेल्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना 25 मार्चला सायंकाळी उकळगाव मनार्डी  (ता. संग्रामपूर) येथे घडली.

प्रशांत तेजराव दामोदर असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्‍याचे लग्‍न 2 एप्रिलला होणार होते. सायंकाळी त्‍याची आई शेतातून घरी आली तेव्‍हा प्रशांतने गळफास घेतल्‍याचे त्‍यांना दिसले. त्‍यांनी एकच हंबरडा फोडला. वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्‍णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. प्रशांतचे वडील दुर्धर आजाराने वारले आहेत, तर भाऊ नदीत बुडून मृत्‍यू पावलेला आहे. या कुटुंबात माऊलीला आता कुणाचाच आधार राहिला नाही. घरात लग्‍नाची तयारी सुरू असताना प्रशांतने असे पाऊल का उचलले असेल, याचीच चर्चा सध्या गावात होऊन हळहळ व्‍यक्‍त होत आहे.