कल्याणातून विवाहिता चिमुकल्यासह बेपत्ता, उंद्रीतील तरुणी गायब!, जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या महिला, तरुणींचा आकडा २० दिवसांत २६ वर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन तरुणी हरल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यातील एक विवाहित असून, तिने चिमुकल्यालाही सोबत नेले आहे. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या महिला, तरुणींचा आकडा अवघ्या २० दिवसांत २६ आहे. यात तिघींनी चिमुकल्यांसह घर सोडले आहे. गायब झालेल्या तरुणींचे प्रमाण लक्षणीय आहे, विशीतील आतील ११ तरुणी घरातून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन तरुणी हरल्याच्‍या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यातील एक विवाहित असून, तिने चिमुकल्यालाही सोबत नेले आहे. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या महिला, तरुणींचा आकडा अवघ्या २० दिवसांत २६ आहे. यात तिघींनी चिमुकल्यांसह घर सोडले आहे. गायब झालेल्या तरुणींचे प्रमाण लक्षणीय आहे, विशीतील आतील ११ तरुणी घरातून निघून गेल्या आहेत.

कल्याणा (ता. मेहकर) येथून सौ. उर्मिला नागेश बोंबले (२४) या विवाहित तरुणीने स्वराज या आपल्या मुलासह घर सोडले. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्‍यामुळे मेहकर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार १९ जूनला करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत उंद्री (ता. चिखली) येथील विशाखा उर्फ खुशी अजयकुमार बोरा ही २० वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. तिचा सगळीकडे शोध घेतल्यानंतर कुटुंबियांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. गेल्या २० दिवसांत १६ पुरुष गायब असून, यात तीन वृद्धांचा समावेश आहे. पैकी एका वृद्धाचा खून झाल्याचे नंतर समोर आले होते.