कोरोना काळात त्या महिलांची उपासमार झाली होती म्हणून…

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात घरकामगार महिला आहेत. यातील काही महिला विधवा आहेत, काही महिलांचे पती व्यसनाधीन असल्याने त्यांना घर चालविणे अवघड झाले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे या महिलांच्या कुटुंबाची उपासमार झाली होती. त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात असते तर घर कामगार महिला व त्यांच्या कुटुंबियावर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली नसती. …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात घरकामगार महिला आहेत. यातील काही महिला विधवा आहेत, काही महिलांचे पती व्यसनाधीन असल्याने त्यांना घर चालविणे अवघड झाले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे या महिलांच्या कुटुंबाची उपासमार झाली होती. त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात असते तर घर कामगार महिला व त्यांच्या कुटुंबियावर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली नसती. कामगार मंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांनी स्वतः जातीने व सामाजिक जाणिवेतून लक्ष देऊन गरीब महिला घर कामगारांच्या कल्याणासाठी महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महिला घरकामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी विशेष अनुदान, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी विशेष तरतूद, घरकामगार महिलांना वृद्धपकाळासाठी पेन्शन योजना, घर कामगार महिलांना हक्काचा निवारा योजना अशा विविध नवीन योजना अंमलात आणाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.