खेळता खेळता धान्याच्या टाकीत उतरलेल्या पाच मुलांचा गुदमरून मृत्यू

राजस्थानात बिकानेर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना जयपूर : खेळता खेळता धान्य साठविण्याच्या टाकीत उतरलेल्या पाच मुलांचा आत गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना बिकानेर जिल्ळ्यात हिंमतासर गावात घडली. तेथे काही लहान मुले खेळत असताना धान्य साठविण्यासाठी ठेवलेल्या रिकाम्या कोठीत उतरले आत उतरल्यानंतर चुकून कोठीचे झाकण बंद झाले. मुलांनी ते काढण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. …
 

राजस्थानात बिकानेर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

जयपूर : खेळता खेळता धान्य साठविण्याच्या टाकीत उतरलेल्या पाच मुलांचा आत गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना बिकानेर जिल्ळ्यात हिंमतासर गावात घडली. तेथे काही लहान मुले खेळत असताना धान्य साठविण्यासाठी ठेवलेल्या रिकाम्या कोठीत उतरले आत उतरल्यानंतर चुकून कोठीचे झाकण बंद झाले. मुलांनी ते काढण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मुलांनी आवाज दिला पण तो बाहेरपर्यंत पोहोचला नाही. काही वेळाने मुले दिसत नाही म्हणून आयांनी शोधाशोध केली. तेव्हा कंटेनरबाहेर मुलांच्या चपला दिसल्या. झाकण उघडून आत पाहिले असताना मुले गुदमरली होती. त्यांना इस्पितळात नेण्यात आले. पण तोवर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही मुले तीन ते आठ वर्षे वयाची होती. त्यात चार मुली व एक मुलगा होता. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करून मुलांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.