गुळाच्‍या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटले ः देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई ः मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटलेले असल्याची टीका त्यांनी केली. ना विचार, ना आचार, ना गव्हर्नन्स तरीही सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने युती अनैसर्गिक युती केल्याचे फडणवीस म्हणाले. हवा तो वाटा मिळाला नाही की ते ओरड …
 
गुळाच्‍या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटले ः देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई ः मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्‍हा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्‍त्र सोडले आहे. गुळाच्‍या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटलेले असल्याची टीका त्‍यांनी केली. ना विचार, ना आचार, ना गव्हर्नन्स तरीही सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने युती अनैसर्गिक युती केल्याचे फडणवीस म्‍हणाले.

हवा तो वाटा मिळाला नाही की ते ओरड करतात. वाटा मिळाला की बंडोबा लगेच थंडोबा होतात, अशी टीकाही त्‍यांनी केले. मंत्रालयासमोर विष घेतलेल्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, यावर दुःख व्यक्‍त करत फडणवीस म्‍हणाले, की शेतकऱ्यांचा वाली कुणी उरलेला नाही. त्‍यांचं म्हणणं ऐकून घेतले जात नाही. असे अधिकारी नियुक्‍त होत आहेत ज्‍यांना गरीब, शेतकऱ्यांकडे पहायला वेळ नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारे कोणतेही निर्णय सरकार अंमलात आणत नाही. त्‍यामुळे आत्‍महत्‍या वाढत असल्याची टीका फडणवीसांनी केली.