देऊळगाव साकर्षात घरावर हल्ला, कुटुंब दहशतीखाली, पोलीस तक्रार दिल्यानंतर मध्यरात्री पुन्‍हा दगडफेक!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालविवाहाची माहिती पोलिसांत दिल्याचा आरोप करून ३२ वर्षीय युवकाच्या घरावर ७ जणांनी हल्ला चढवला. मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने त्याच्या लहान भावावर हल्ला करून जखमी केले. ही घटना काल, १९ जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर मध्यरात्री पुन्हा तक्रारदार युवकाच्या घरावर दगडफेक झाली. त्यामुळे हे …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बालविवाहाची माहिती पोलिसांत दिल्याचा आरोप करून ३२ वर्षीय युवकाच्‍या घरावर ७ जणांनी हल्ला चढवला. मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. चाकूने त्‍याच्‍या लहान भावावर हल्ला करून जखमी केले. ही घटना काल, १९ जूनला सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली. हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर मध्यरात्री पुन्‍हा तक्रारदार युवकाच्‍या घरावर दगडफेक झाली. त्‍यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आले असून, हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी त्‍यांनी केली आहे.

गोपाल नारायण आमले, अन्सार खाँ नबु खाँ पठाण, सुरेश नारायण आमले, अशोक सखाराम पायघन, रामा सुभाष आमले, दिलीप पायघण, योगेश पायघण (सर्व रा. देऊळगाव साकर्षा, ता. मेहकर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. अश्विन नारायण पायघण (३२, रा. देऊळगाव साकर्षा) या युवकाने जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की काल सायंकाळी गोपाल आमले व त्‍याच्‍या साथीदारांनी घराजवळ येऊन शिविगाळ सुरू केली. अन्सारने त्‍याच्‍या लहान भावाच्‍या कानाखाली मारली. अश्विन त्‍यांना समजावत असताना अन्य आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली. गोपाल आमले याने चाकूने अश्विनचा भाऊ मंगेशवर हल्ला चढवला. यात मंगेश जखमी झाला. त्‍यानंतर आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी ७ हल्लेखोरांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.

मध्यरात्री पुन्‍हा हल्ला
पोलिसांत तक्रार करून घरी परतल्यानंतर अश्विनच्‍या घरावर मध्यरात्री पुन्‍हा हल्ला झाला. घरावर दगडफेक करण्यात आली. त्‍यामुळे हे कुटुंब दहशतखाली आले आहे. बालविवाहाची माहिती आपण दिल्याचा संशय हल्लेखोरांना आहे. माजी तंटामुक्‍ती समितीचा अध्यक्ष आपल्याला ही माहिती पोलिसांनीच पुरवल्याचे सांगतो. त्‍यातूनच कुटुंबावर हा हल्ला होत असल्याचा आरोप अश्विनने केला आहे. हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करून आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी त्‍याने केली आहे.