पाच दिवस झाले तरी लागेना विलासचा पत्ता, वडील हवालदील!; चिखलीतून विवाहिता, शेगावमधून तरुण गायब
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रागाच्या भरात निघून गेलेला 22 वर्षीय तरुण आज, 5 जूनला सहा दिवस उलटले तरी अजूनही घरी परतलेला नाही. त्यामुळे त्याचे वडील हवालदील झाले आहेत. पोलीसही तपास करत आहेत.
विलास किशोर गायकवाड हा साखळी बुद्रूक येथील रहिवासी असून, तो 31 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास रागाच्या भरात घरातून निघून गेला. तेव्हापासून तो गायब आहे. त्याचे वडील किशोर फकीरा गायकवाड यांनी विलासचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाइकांकडे विचारपूस केली. मात्र तो काही मिळून आला नाही. अखेर 1 जूनला त्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र अद्याप तो मिळून आलेला नाही. रंग सावळा, उंची पाच फूट पाच इंच, सडपातळ बांधा, अंगात पांढरे शर्ट, निळी जिन्सी पँट असे त्याचे वर्णन आहे. कुणाला तो आढळल्यास बुलडाणा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा.
दरम्यान, शेगावच्या जुने महादेव मंदिराजवळून काल 35 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल असताना आज याच भागातील संतोष रामभाऊ आंबुसकर हा 22 वर्षीय तरुणही बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. तो घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेला.
चिखली येथील छत्रपतीनगर येथील रहिवासी सौ. दुर्गा नितीन शेळके ही 20 वर्षीय विवाहितासुद्धा गायब झाली आहे. ती हरवल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.