बिरसिंगपूर मध्ये ‘आमचे गाव आमची जबाबदारी’ मोहीम; सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच राजूदादा मुळेंचा पुढाकार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिरसिंगपूर (ता. बुलडाणा) येथे कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून नव्याने ‘आमचे गाव आमची जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. गाव कोरोना मुक्त व्हावे यासाठी सरपंच वैशाली शिंदे व उपसरपंच राजूदादा मुळे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच विविध उपाययोजना केल्या आहेत. दुसऱ्यांदा राबविण्यात आलेले ‘आमचे गाव’ हे अभियान याचाच भाग होय. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बिरसिंगपूर (ता. बुलडाणा) येथे कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून  नव्याने ‘आमचे गाव आमची जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. गाव कोरोना मुक्त व्हावे यासाठी सरपंच वैशाली शिंदे व उपसरपंच राजूदादा मुळे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच विविध उपाययोजना केल्या आहेत.

दुसऱ्यांदा राबविण्यात आलेले ‘आमचे गाव’ हे अभियान याचाच भाग होय. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने सुसज्ज नियोजन करण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, एमपीडब्ल्यू आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले. त्यांची 4 पथके करण्यात आली. या पथकांनी घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनर, ऑक्सिमिटरने गावकऱ्यांचे तापमान, शरीरातील ऑक्सिजन पातळी मोजली. याशिवाय ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या लसीकरणावर भर दिल्याचे राजूदादा मुळे यांनी सांगितले. आजवर 400 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांवरील 380 जणांचे लसीकरण झाले असून 160 जणांना लवकरच लस देण्याचे नियोजन आहे. पाडळी पीएचसीमध्ये लसीकरणासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.