महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी

मुंबईः काँग्रेसकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका सुरू केली असताना या दोन्ही पक्षांनीही काँग्रेसची कोंडी करायचे ठरविले आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक एक वर्ष लांबणीवर टाकून काँग्रेसला शह दिला जात आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभेच्या अधिवेशनातच घेण्याचा काँग्रेसचा आग्रह होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आमदारांच्या कोरोना चाचणीचं कारण पुढं करून विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली …
 

मुंबईः काँग्रेसकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका सुरू केली असताना या दोन्ही पक्षांनीही काँग्रेसची कोंडी करायचे ठरविले आहे. राज्यसभेची पोटनिवडणूक एक वर्ष लांबणीवर टाकून काँग्रेसला शह दिला जात आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभेच्या अधिवेशनातच घेण्याचा काँग्रेसचा आग्रह होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आमदारांच्या कोरोना चाचणीचं कारण पुढं करून विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यानंतर अचानक भास्कर जाधव यांचं नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पुढ करण्याची खेळी खेळण्यात आली. काँग्रेसनं या पदावरचा हक्क कायम ठेवला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणि डेल्टा विषाणूचे कारण पुढे करीत राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यसभा पोटनिवडणूक कोरोना साथीत न घेण्याची विनंती केली आहे.

राज्यातून मार्च २०२०मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार राजीव सातव यांचे १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाने १९ मे रोजी सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाल्याबाबतची अधिसूचना काढली होती. त्यानुसार ३० जूनला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून राज्यसभा पोटनिवडणूक घेण्याबाबत विचारणा केली होती. आयोगाच्या या पत्राला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्र पाठवून उत्तर सध्या निवडणूक घेण्याबाबत असमर्ता दाखविली. राज्यसभेच्या या जागेची मुदत एक वर्ष राहिली असल्यानं आता ती निवडणूक होऊच नये, असा राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रयत्न आहे.