महासंग्राम ग्रामपंचायतीचा… जिल्ह्यात 9664 उमेदवार दंड थोपटून!; 27 ग्रामपंचायती बिनविरोध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यात 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, 9664 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणुकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यात 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, 9664 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणुकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या 27 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, या ग्रामपंचायतींतील 95 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 527 ग्रामपंचायतींसाठी 13 हजार 320 उमेदवारांकडून 13 हजार 609 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 179 उमेदवारांचे 210 अर्ज नांमजूर करण्यात आले. छाननीअंती बाद झालेल्या अर्जांनंतर 13 हजार 141 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज शिल्लक होते. आता माघारीनंतर 9 हजार 664 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. सर्वात जास्त 1387 उमेदवार खामगाव तालुक्यात असून, बुलडाणा तालुक्यात 1171 उमेदवार, चिखलीमध्ये 1110, देऊळगाव राजा तालुक्यात 262, सिंदखेड राजामध्ये 610, मेहकरमध्ये 795, लोणार तालुक्यात 301, शेगाव तालुक्यात 635, जळगाव जामोदमध्ये 456, संग्रामपूर तालुक्यात 574, मलकापूरमध्ये 581, नांदुरा तालुक्यात 776 व मोताळा तालुक्यात 1006 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.