‘मी मोदींचा चेहराही पाहू इच्छित नाही‘

ममतांचा हल्लाबोल; मते न देता भाजपला अलविदा करण्याचे मतदारांना आवाहन मिदनापूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकांमुळे हे राजकीय वैर टोकाला गेले आहे. मिदनापूर मतदारसंघात एका रॅलीला मार्गदर्शन करताना ममता बॅनर्जी यांनी ‘मी नरेंद्र मोदी यांचा चेहराही पाहू इच्छित नाही. तुम्ही त्यांना यावेळी मते …
 

ममतांचा हल्लाबोल; मते न देता भाजपला अलविदा कण्याचे मतदारांना आवाहन

मिदनापूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकांमुळे हे राजकीय वैर टोकाला गेले आहे. मिदनापूर मतदारसंघात एका रॅलीला मार्गदर्शन करताना ममता बॅनर्जी यांनी ‘मी नरेंद्र मोदी यांचा चेहराही पाहू इच्छित नाही. तुम्ही त्यांना यावेळी मते न देताच निरोप द्या,‘ असे आवाहन केले आहे. भाजपला यावेळी मतदारांनी कायमचे अलविदा करावे.आम्हाला दंगेखोर, लुटेरे, दुर्योधन, दु:शासन नको आहेत. भाजपने यंदा आमच्या पक्षातील बंडखोरांना तिकीटे वाटली असून त्यांच्या पक्षातील जुने नेते घरी बसून अश्रू ढाळत आहेत. विरोधकांनी आधी माझ्या डोक्यावर वार केले व आता माझा पाय अधू केला आहे. पण मी एक योद्धा आहे. त्यांच्या असल्या हल्ल्यांना घाबरणार नाही.मी लढेन आणि त्यांना हरवूनच थांबेन, असा इशाराही ममतांनी दिला आहे. ममतांच्या या टीकेला अद्याप भाजपच्या गोटातून कोणतेच प्रत्युत्तर दिले गेलेले नाही. परंतु यानिमित्ताने ममतांचा पराकोटीचा मोदी विरोध पुन्हा एकदा दिसून आला आहे.