“लालपरी’विना ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शाळा, कॉलेज, क्लासेसमध्ये जाण्या येण्यास एसटी बसेस उपलब्ध नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल होत असून, ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीने उपविभागीय अधिकारी तथा एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस वैभव अढाव, जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल, नगरसेवक आशिष सारसर, युवा …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शाळा, कॉलेज, क्‍लासेसमध्ये जाण्या येण्यास एसटी बसेस उपलब्‍ध नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल होत असून, ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्‍या विद्यार्थी आघाडीने उपविभागीय अधिकारी तथा एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस वैभव अढाव, जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल, नगरसेवक आशिष सारसर, युवा मोर्चाचे शहर संघटक गौरव डोबे, योगेश केदार, श्याम टावरी, सोमेश लाड, वैभव भगत, गोपाल दामोदर, सोमेश लाड, गौरव बैरागी, ऋषिकेश सुटोने, आशुतोष भोपळे, अंशुल भगत, प्रयाग फुसे, ओम कपले, कार्तिक दीक्षित, उज्‍ज्वल हिस्सल, विनायक हिस्सल, अभिषेक राऊत आदी उपस्‍थित होते.