शेतीशी निगडित दुकानांच्‍या वेळा आता सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र पर्जन्यमान सुरू झाल्यानंतर कृषी निगडित दुकानांवर कृषी निविष्ठा खरेदीसाठी या वेळेत शेतकऱ्यांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र, शेतीशी संबंधित असलेली उत्पादने व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र पर्जन्यमान सुरू झाल्यानंतर कृषी निगडित दुकानांवर कृषी निविष्ठा खरेदीसाठी या वेळेत शेतकऱ्यांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र, शेतीशी संबंधित असलेली उत्पादने व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 1 मे रोजी परवानगी दिली आहे. मात्र या आस्थापनांनी कोविड १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हा आदेश बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.