200 कोंबड्यांनी लागोपाठ टाकल्या माना!; चिखली तालुक्यातील शेतकरी धास्तावले!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भानखेड (ता. चिखली) शिवारातील पोल्ट्रीफार्ममध्ये 200 देशी कोंबड्या अचानकपणे दगावल्याची बाब 23 जानेवारीला समोर आली. आधीच बर्ड फ्लूचे सावट असताना त्यात अचानक एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या ठिकाणी पशूवैद्यकीय अधिकार्यांनी धाव घेत पंचनामा केला.शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पॉल्ट्रीफार्म सुरू केले होते. 23 …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भानखेड (ता. चिखली) शिवारातील पोल्ट्रीफार्ममध्ये 200 देशी कोंबड्या अचानकपणे दगावल्याची बाब 23 जानेवारीला समोर आली. आधीच बर्ड फ्लूचे सावट असताना त्यात अचानक एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या ठिकाणी पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी धाव घेत पंचनामा केला.
शेतकरी जनार्दन इंगळे यांनी त्यांच्या शेतात 200 देशी कोंबड्यांचे पॉल्ट्रीफार्म सुरू केले होते. 23 जानेवारीला सकाळी कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच गावातील इतर नागरिकांच्याही एक-दोन अशा काही कोंबड्या दगावल्याचेही समोर आले. या प्रकाराची माहिती मिळताच पशूधन तालुका अधिकारी डॉ. दांडगे, पशूवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पर्यवेक्षक डॉ. प्रवीण निळे, डॉ. पूनम तायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठवले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण कळू शकेल, असे डॉ. दांडगे यावेळी म्हणाले. पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशूवैद्यकीय रुग्णालयाला कळवावे, असे आवाहनही यावेळी डॉ. दांडगे यांनी केले आहे.