33 कोटी वृक्षलागवडीमधील वृक्षारोपणात कुठलाही गैरप्रकार नाही!; वनविभागाचा खुलासा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद वन परिक्षेत्रात 33 कोटी योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. (बुलडाणा लाइव्हमध्ये नव्हे!) मात्र जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यांतील एकूण लागवड करण्यात आलेल्या 2 लक्ष 61 हजार रोपांची मे 2021 पर्यंत तृतीय वर्षातील जीवंत रोपांची सरासरी 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या रोपांची माहिती छायाचित्रे व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद वन परिक्षेत्रात 33 कोटी योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. (बुलडाणा लाइव्‍हमध्ये नव्‍हे!) मात्र जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यांतील एकूण लागवड करण्यात आलेल्या 2 लक्ष 61 हजार रोपांची मे 2021 पर्यंत तृतीय वर्षातील जीवंत रोपांची सरासरी 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. या रोपांची माहिती छायाचित्रे व चित्रफीतीसह mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दोन्ही तालुक्यांतील वृक्ष लागवड ही बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, मजूर कामगार सहकारी संस्था यांच्‍यामार्फत काम वाटप करूनच नियमानुसारच करण्यात आले आहे. या वृक्षलागवडी संदर्भातील सर्व कामे वेळोवेळी त्यांचे मार्फत करून घेण्यात आलेली आहे. परिक्षेत्रातील 33 कोटी वृक्षलागवड यशस्वी असून कुठलाही गैरप्रकार सदर कार्यालयामार्फत झालेला नाही, असा खुलासा वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जळगाव जामोद यांनी केला आहे.